पोस्ट्स

मी श्रीमंत कसा होऊ शकतो श्रीमंत विचार खरी श्रीमंती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

श्रीमंत कसे व्हावे? पैशांचाखेळ की इच्छांचे गणित?

इमेज
  जवळचा एक मित्र गमावला..  मनाला खूप हेलावून टाकणारी घटना नुकतीच आयुष्यामध्ये घडून गेली. नियती एवढी पण कठोर असते. याचाच परिचय त्या दिवशी आयुष्यामध्ये झाला. ज्याच्याबरोबर लहानपणापासून खेळलो, बागडलो. अशा एका जीवाभावाच्या मित्रांन खूपच अनपेक्षित वेळी जगाचा आहे आणि माझाही निरोप घेतला होता. त्याच्या अकाली जाण्याने माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण केली होती. त्याच्या जाण्याची हानी कशानेच भरून येणारे नव्हती. त्याच्याबरोबर शाळेत घालवलेले एक एक दिवस. एकेक आठवणी डोळ्यांमध्ये अश्रूंबरोबर तरळत होत्या. अनंतामध्ये तो विलीन झाला होता ;पण माझ्या मनामध्ये विचाराचं 'अनंत काहूर ' उठलं होतं. आणि मी माझ्या अस्वस्थ मनामध्ये त्याची उत्तरं शोधत होतो.  मित्राच्याअचानक जाण्याने विचारात बुडलेला एक व्यक्ती   आपण संवाद हरवून बसलो आहे..  सोशल मीडियाने भर भरलेला हा काळ. जग अगदी कवेमध्ये आल्यासारखं वाटतं. संपर्काचे एक ना अनेक साधने उपलब्ध. फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, अशी एक ना अनेक साधना माझ्या हातात. पण खरच आपण मनाने एकमेकांच्या जवळ येतो का? एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभाग...