पोस्ट्स

विचार व प्रेरणा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

"DJ वर बेभान तरुणाई: एक वास्तव"

इमेज
        "गाण्याचा गोंगाट की संस्कृतीचा संकोच?"  वर्गामध्ये माझं लेक्चर चालू होतं. मुलं मन देऊन लेक्चर ऐकत होते. मुलांना थोडासा विरंगळा म्हणून, आजचा संघर्ष आणि उद्याचा भविष्य यावर थोडसं प्रेरणादायी मोटिवेशनल पीच मी त्यांना देत होतो. आजचा युवक, सामाजिक जबाबदाऱ्या, आपली स्वप्न आणि ध्येय, त्यासाठी  करावा लागणार संघर्ष आणि त्याग, आणि उद्याचं उज्वल भविष्य. यासारख्या अनेक विषयावर आमची चर्चा रंगात आली होती. मी ही जीवाच्या आकांताने बोलत होतो. अन मुलांनाही ते आपले भविष्य  साठी महत्त्वाचं आहे म्हणून ऐकावं वाटत होतं..  तेवढ्यात बाहेरून दण -दण असा मोठा आवाज येऊ लागला. माझं बोलणं मुलांना नीट समजेना असं झालं. मी मुलांना म्हणलो काय आहे?कसला आवाज आहे हा? त्यावेळी मुलं मला म्हटली, आज कसली तरी मिरवणूक आहे त्याच्यासाठी डीजे लावला आहे. त्याचा हा आवाज. मुलांचाही लक्ष त्या आवाजाकडे जात होतं. हे मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं. तेवढ्यात मुलंही मला म्हंटली सर आज लेक्चर सोडा ना लवकर. आम्हाला मिरवणूक बघायला जायचं आहे. बाहेरून येणारा मोठमोठ्याचा आवाज आणि मुलांचं बाहेर लक्ष या...

"ज्ञान, संघर्ष आणि समतेचा दीपस्तंभ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर"

इमेज
            तव तेजाचा एक अंश दे...             तव ज्ञानाचा एक थेंब दे..             तव समतेचा एक कण दे..             तव करुणाची मज उब दे...     मागणं........ हा मनुष्याचा  स्थायी भाव. आपण देवाकडं सतत काही ना काही मागत असतो.. माझं काय चुकत नसेल तर बरोबर आहे का? आपण अगदी हक्कान देवाकडे मागत असतो. पण देवानंतर जर कोणाकड काही मागू वाटतं असेल तर त्या आपल्या महापुरुषांकडून!!!!  आपल्या जीवनाची शिदोरी कायम भरावी, एवढा अथांग  महासागर या सगळ्या आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलं आहे.. त्यामधून मला ज्यावेळी स्वतंत्र, समता, बंधुता, ज्ञान व न्याय हे कोणाकडे तरी मागव वाटतं. त्यावेळी माझ्यासमोर फक्त आणि फक्त....  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतं..   " हे हास्य केवळ हास्य नव्हे, ते एका युगाचं आत्मविश्वास आहे."   स्वतंत्र,समता बंधुता आणि ज्ञान व न्याय एवढे सगळे गुण या महामानवाकडून मागताना माझं मन मला म्हणत होतं. या गुणांची ...

जीवन परी म्हणजेच लालपरी!

इमेज
                              आज तिच्याबरं प्रवास.... आज गावी जायचच हा निश्चय करून ,लवकरच रूमवर आलो .आवश्यक तेवढे साहित्य व कपडे बॅगमधे भरून गडबडीतच रूम लॉक करतं होतो.तेवढ्यात शेजारचे काका म्हटले , कारे काय गडबड गावी निघाला आहे का ? मी त्याना हो म्हंटलं.आपल्या आयुष्याचं बालपण गावी जगलेल्या या काकांना आम्ही मुलं गावी निघालो की किती कौतुक होत असे हे शब्दात सांगणे कठीण आहे.कदाचित त्याना ही आपलं शालेय जीवन आठवत असेल.असेच ते ही कधी काळी घराच्या ओढीनं गावी गेले असतील.त्या आठवणी त्याना आमच्या रुपानं आठवून खरोखरच खूप आनंद होत असेल.त्यांचा हो आनंद कितीतरी वेळा मी त्याच्या चेहऱ्यावर टिपला होता.आठवणी ! किती गोड असतात ना ? पण आठवणी फ़क्त अनुभवता येतात जगता येत नाही. काकांचा निरोप घेऊन मी लगबगीनं चालू लागलो.परतीचा प्रवास  आपोआप जलद घडतो असं म्हणतात.त्यामुळं पाऊले पटापट पडत होती.अवती भवती वाहनांची प्रचंड गर्दी अन् लोकांची वर्दळ होती.पण यांची कसलीच जाणीव आपल्याला होत नसते कारणं आपण आपल्यां दुनियेत रमलेलो असतो.प्रत्येक जण आ...