"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
माणूसपण – आता कुठं दिसतंय का?
“कधी कधी वाटतं…
हा रस्ता मी चालतोय की रस्ता माझ्या मागे चालत येतोय?”
"रस्ते कितीही लांब असले तरी
माणूसपणाचं गाव अजूनही सापडलेलं नाही!"
आज आपण इतक्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आहोत की जग एक "ग्लोबल व्हिलेज" झालं आहे. पण तरीही, माणसं अधिक एकटी झाली आहेत. आपल्याला जग जिंकायचंय, पण त्यासाठी आपली संवेदना गमावलीय. आज कोणाला काही झालं, तर आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही, वाटतं "आपलं नाही ना, मग काय करायचं?"
कधी काळी घरातले मोठे अंगणात बसून गप्पा मारायचे. आज सगळे एकाच घरात असूनही स्क्रीनमध्ये बंद झालेत.
आपल्याला दुसऱ्याच्या मनात डोकावणं, त्याच्या भावनांची किंमत करणं, ही कला हरवून बसलोय आपण. शाळा शिकवलं की पाटी-पुस्तकं; पण माणूस होण्याचं शाळा विसरलीत का?
"एकटेपणातच खरं माणूस सापडतो,
कारण गर्दीत चेहऱ्यांचे मुखवटे असतात."
त्या रिकाम्या बाकड्यासारखंच झालंय आजचं समाजजीवन — जागा आहे, पण कोणी जवळ येत नाही. संवादाची जागा फॉरवर्डेड मेसेजेसनी घेतलीय. विचारांची जागा हेडलाईन्सनी भरलीय.
> माणुसकी कुठं गेली?
ती तर होती प्रत्येकाच्या नजरेत, हळवेपणात, आणि निःस्वार्थ वागण्यात.
आता माणुसकीची जागा घेतलीय ‘स्वतःच्या फायद्या’ने. कोणाला मदत करायला अगोदर विचार येतो – “मला काय मिळणार यातून?”
आपण नात्यांमध्ये ‘गुणवत्ता’ ऐवजी ‘सोयी’ शोधतो. आणि म्हणूनच माणूसपण आता केवळ शब्दांपुरतं उरलंय...
शेवटी, इतकंच म्हणावंसं वाटतं…
“जग बदलतंय हे खरंय,
पण आपण आपलं माणूसपण विसरून चाललोय.
त्याला पुन्हा शोधा — एखाद्या ओळखीच्या हास्यात,
किंवा अनोळखीच्या अश्रूंमध्ये.”
Chaan 👌
उत्तर द्याहटवा